होम मुक्ताई दूत जळगाव देश – विदेश महाराष्ट्र राजकीय खेळ व्हायरल लाइफस्टाइल मनोरंजन
Breaking

वाढत्या उन्हामुळे जळगाव जिल्ह्यातील शाळा आता ‘सकाळच्या सत्रात’!

Follow Us:

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे आदेश; ७ ते ११:४५ पर्यंत भरणार शाळा

जळगाव: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या उष्णतेचा परिणाम विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होऊ नये, यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्यात आला असून, आता सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

काय आहे नवीन वेळापत्रक?

​जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) मिनल करणवाल यांनी यासंदर्भातील अधिकृत पत्रक प्रसिद्ध केले आहे. नवीन निर्णयानुसार, आता जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळा आणि हायस्कूल सकाळी ७:०० वाजता भरतील आणि दुपारी ११:४५ वाजता सुटतील. या बदलाची अंमलबजावणी आज शुक्रवारपासूनच लागू करण्यात आली आहे.

दुर्लक्ष करणाऱ्यांवर होणार कारवाई!

​उन्हाच्या तीव्रतेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत, हा यामागील मुख्य उद्देश आहे. मात्र, या आदेशाचे पालन करण्यात कोणत्याही शाळेने टाळाटाळ केल्यास किंवा विलंब केल्यास संबंधित शाळेचे मुख्याध्यापक आणि गटशिक्षणाधिकारी (BDO) यांना जबाबदार धरले जाईल, असा कडक इशाराही प्रशासनाने दिला आहे.
​जिल्ह्यातील पालकांनी या बदलाची नोंद घ्यावी आणि शाळा व्यवस्थापनाने तातडीने अंमलबजावणी करावी, अशा सूचना शिक्षण विभागामार्फत देण्यात आल्या आहेत.

Join WhatsApp

Join Now

Subcribe Youtube

Subcribe Now

Leave a Comment

error: Content is protected !!